“नमामि चंद्रभागा” योजना अंतर्गत पर्यावरणीय पुनर्स्थापना व उद्यान विकास कामांचे भूमिपूजन संपन्न.


शिरूर / फिरोज सिकलकर

शिरूर नगरपरिषद हद्दीतील स. नं. २६९ पै. व २७० येथे “नमामि चंद्रभागा” अभियानांतर्गत नदीकाठच्या क्षेत्राची पर्यावरणीय पुनर्स्थापना (Environmental Restoration), उद्यान विकास (Garden Development) व इतर अनुषंगिक कामांच्या शुभारंभाचा भूमिपूजन सोहळा आज दिनांक ०२ मार्च २०२६ रोजी सकाळी ०९.३० वा. घोडनदी किनारा (एसटीपी प्लांट शेजारी) येथे उत्साहात संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाचे भूमिपूजन माननीय आमदार श्री. ज्ञानेश्वर माऊली (आबा) कटके यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमास कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे होत्या. मा. श्री. प्रितम पाटील, मुख्याधिकारी, शिरूर नगरपरिषद ,मा. श्री. मितेश प्रदीप गादिया, उपनगराध्यक्ष, श्री. सुनिल शंकर जाधव, सभापती, सार्वजनिक बांधकाम समिती,श्री. एजाज अन्सार बागवान, सभापती, स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती,सौ. सुनिता संतोष पोटे, सभापती, पाणीपुरवठा, जलनिस्सारण व विद्युत समिती,सौ. स्वाती चेतन साठे, सभापती, नियोजन व विकास गृहनिर्माण, टपरी व झोपडपट्टी पुनर्वसन समिती, सौ. आयेशा कलिम सय्यद, सभापती, महिला व बालकल्याण समिती, श्री. संतोष प्रभाकर थेऊरकर, श्री. सागर त्रिंबक नरवडे, सौ. पुजा पुष्कराज पोटावळे, सौ. सविता सचिन राजापुरे, सौ. स्वीटी दत्तराव शिंदे, श्री. अमित संपतराव कर्डिले, श्री. उमेश कैलास शेळके, श्री. निलेश पवार, सौ. रिंकू राजेश जगताप, श्री. अभिजित गणेश पाचर्णे इत्यादि सन्मानिय पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. शिरूर शहरातील अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते. तसेच श्री. राहुल पिसाळ, प्रशासकीय अधिकारी , श्री. पंकज काकड, नगरचना सहायक,श्री. दीपक कोल्हे, सहा. करनिरक्षक, श्री. सचिन वाळूंज, अग्निशमन अधिकारी, श्री. महेश कदम व इतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी माननीय आमदार महोदयांनी आपल्या मनोगतात नमूद केले की, “नदी संवर्धन व हरित क्षेत्रवाढ ही केवळ विकासाची बाब नसून पुढील पिढ्यांसाठी पर्यावरणीय जबाबदारी आहे.” नगराध्यक्षा महोदया यांनी नमूद केले की, या योजनेमुळे शिरूर शहरात पर्यावरणपूरक सार्वजनिक जागा (Eco-Friendly Public Space) निर्माण होणार असून नागरिकांना आरोग्यदायी व सुरक्षित वातावरण उपलब्ध होईल.

“नमामि चंद्रभागा” अभियानांतर्गत नदीकाठ स्वच्छता, वृक्षारोपण, चालण्याचे मार्ग (Walking Track), विश्रांती क्षेत्र (Sitting Area), तसेच सौंदर्यीकरणाची कामे टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे शहराच्या पर्यावरणीय संतुलनास चालना मिळणार असून शाश्वत शहरी विकास (Sustainable Urban Development) साध्य होण्यास मदत होईल.

सदरील कार्यक्रमास सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे श्री. प्रितम पाटील, मुख्याधिकारी, शिरूर नगरपरिषद यांनी आभार व्यक्त केले.


5
कृपया वोट करा

FS NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!